Home ताज्या बातम्या महाराष्ट्र बंद मागे,हा बंद यशस्वी; कार्यकर्त्यांकडून कोणताही हिंसाचार नाही- प्रकाश आंबेडकर

महाराष्ट्र बंद मागे,हा बंद यशस्वी; कार्यकर्त्यांकडून कोणताही हिंसाचार नाही- प्रकाश आंबेडकर

60
0

मंबई,दि.24जानेवारी2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-‘ आंबेडकरी कार्यकर्त्यांनी कोणतीही हिंसा केली नाही. त्यामुळे ज्याठिकाणी हिंसाचार झाला त्याठिकाणी आम्ही पोलिसांशी बोलणार आहोत. आमचा आजचा बंद यशस्वी झाला. यात सुमारे शंभरहून अधिक संघटनानी आजच्या बंदला समर्थन दिले होते. चार वाजता हा बंद आम्ही मागे घेतला,’ अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. बंद मागे घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारित कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या विरोधात आज, महाराष्ट्र ‘बंद’चे आवाहन केले आहे. बंदला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत असल्याचा दावा आघाडीचे अध्यक्ष अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
या बंदमध्ये सुमारे २५ ते ३० संघटना सहभागी होतील असा दावा वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला होता. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आजचा महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता. तसेच नोटबंदी, जीएसटी या निर्णयांमुळे केंद्र सरकाविरोधात निषेधाचं वातावरण तयार झालं. त्यामुळे केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही बंदचं आवाहन केलं आहे. आमच्या बंदमध्ये २५ ते ३० संघटना सहभागी होतील याचा आम्हाला विश्वास होता, असे प्रतिपादन प्रकाश आंबेडकर यांनी केले.
तसेच ‘जातीनिहाय जनगणनेची मागणीही त्यांनी या वेळी केली आहे. केंद्र सरकारच्या नागरिकत्व कायद्याला विरोध करीत आंबेडकर यांनी ढासळत्या अर्थव्यवस्थेला मोदी सरकार जबाबदार असल्याची टीका केली. लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होत आहे. नागरिकत्व कायद्याला विरोध होत असताना, हा कायदा लागू करणारच, अशी भूमिका शहा मांडत आहेत, हे दुर्दैव आहे,’ असे आंबेडकर म्हणाले.दरम्यान, ‘महाराष्ट्र बंद करुन झोपलेल्या सरकारला जागे करु, हा बंद शांततेने करण्यात आला आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं, तसेच वंचित बहुजन आघाडी ही भाजपच्या चुकीच्या धोरणांना सातत्याने विरोध करत आहे. आतादेखील आम्ही भूमिका घेतली आहे. आमच्यानंतर इतर लोक भूमिका घेतील, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले,वंचित बुहजन आघाडीने पुकारलेला बंद यशस्वी झाला आहे. चार वाजल्यानंतर जनजीवन सुरळीत व्हावे यासाठी बंद मागे घेत आहोत असे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले. आम्ही बंदसाठी जबरदस्ती केली नाही तसेच हिंसाचारही केलेला नाही असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला. सीएए आणि एनआरसीच्या विरोधासाठी प्रकाश आंबेडकर यांनी हा बंद पुकारला होता.

Previous articleप्रजेचा विकास चे संपादक व लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलचे पुणे जिल्हा प्रतिनिधी विकास कडलक यांना डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता पुरस्कार जाहीर
Next article22 वर्षीय तरुणाच्या अटके नंतर त्याच्या सुटकेसाठी चक्क त्याची 60 वर्षांची प्रेयसी पोलीस स्थानकात पोहचली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

twenty − 6 =