Home ताज्या बातम्या अॅड. प्रकाश आंबेडकर साहेबच मुख्यमंत्री होणार-शहानवाज शेख

अॅड. प्रकाश आंबेडकर साहेबच मुख्यमंत्री होणार-शहानवाज शेख

68
0

भोसरी,दि.१ सप्टेंबर २०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-अॅड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबूत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी तून प्रयत्न केले जातात पण त्या प्रयत्नांन मध्ये खोट घालीत अनेक विरोधक दिग्गज दिशाभूल करत आहेत त्यात भाजपनीही आता कुठेही कसर सोडली नाही,बाळासाहेबांना ह्यावेळेस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवणं ही काळाची गरज आहे आणि त्यामुळेच वंचित बहुजन आघाडी चे सर्वच ठिकाणी बाळासाहेबांच्या पाठीशी सर्व समाज उभा राहत आहे हे बघून आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणीस यांना वाटत आहे की आता ते मुख्यमंत्री राहतील की नाही त्यांना त्यांच्या स्वतःच्या पदाची भीती वाटत असल्याने त्यांनी स्वतः वंचित बहुजन आघाडी विरोधी बाकावर बसेल असे घोषित करत आहे,ईव्हिएम मध्ये घोटाळा जर नाही केला तर नक्कीच वंचित बहुजन आघाडी सत्तेत असत्यात बसेल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचे दावेदार अनेक असतील पण महाराष्ट्राला साजेल आणि सर्वांच्या विचार करेल असा मुख्यमंत्री फक्त प्रकाश आंबेडकर होऊ शकतात त्यामुळे सर्व समाजाला न्याय देणारा एकमेव नेता महाराष्ट्रात उरलेला आहे हळुहळु सर्व नेत्यांचे अस्तित्व हे डबघाईला आलेल्याने त्यामुळे अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली त्या सर्व गोष्टी लक्षात घेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री प्रकाश आंबेडकर झाले तर सत्ताधारी पक्षाला केंद्रातून सत्ता जाईल आणि महाराष्ट्रामध्ये एकमेव अभ्यासू नेते फक्त प्रकाश आंबेडकर आहेत त्यांचे हात मजबूत करण्यासाठी ह्या मक्तेदारी असणाऱ्या विधानसभे मधून शहानवाज शेख मी स्वतः भोसरी विधानसभेतून निवडणूक लढवत आहे बाळासाहेबांचा शब्द आमच्यासाठी अंतिम शब्द असून आम्ही यावेळेस बाळासाहेबांना मुख्यमंत्र्यांच्या रुपात पाहत आहोत आणि ते नक्कीच मुख्यमंत्री होतील, मुख्यमंत्र्यांना एक गोष्ट सांगतो की भाजप विरोधी बाकावर असेल आणि वंचित यावेळेस सत्तेवर असेल असे चित्र डोळ्यासमोर आहे आणि ते टाळण्यासाठी मुख्यमंत्री अनेकदा वंचित विरोधी बाकावर बसेल असे बोलून जनतेची दिशाभूल करत आहे पण मतदार हा जागृत आहे आणि या वर्षी मतदार नक्कीच वंचित बहुजन आघाडीला मतदान करेन लोकसभेचे दृश्य चित्र लक्षात घेतलं तर लोकसभेमध्ये पहिल्याच प्रयत्नात मतदारांपर्यंत पोहोचण्याचा कुठेतरी कमी पडल्याची जाणीव ह्यावर्षीच्या सर्व कार्यकर्त्यांना झाली आहे आणि त्यामुळे या विधानसभेमध्ये कुठेही त्याची कसूर सोडली जाणार नाही आणि महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी वंचित चे कार्यकर्ते स्वखर्चाने मेहनतीने मैदानात मदत करत असतात आणि ह्या वेळेस जास्त ताकतीने करतील त्यामुळे वंचित बहुजन आघाडी नक्कीच सत्तेत येईल आणि या सर्वांचे प्रश्नांना सोडवण्यासाठी महाराष्ट्राचा विकास साधेल असा मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल अल्पसंख्यांकाचा असेल झोपडपट्ट्यांचा असेल अन्न वस्त्र निवाऱ्याचा असेल या सर्व मूलभूत गरजांवर लक्ष देणारा एकमेव नेता फक्त अॅड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हेच आहेत आणि मी तमाम महाराष्ट्रातील जनतेला आव्हान करतो की चला आता कोणाच्या भूलथापांना बळी न पडता या महाराष्ट्राला एक स्वच्छ चेहरा स्वच्छ प्रतिमा आणि अभ्यासू नेता ज्याला सर्व क्षेत्रातील जाणीव आहे अशा ह्या नेतृत्वाला बाळासाहेब आंबेडकर यांना आपण मुख्यमंत्री बनवूया आणि या वंचित बहुजन आघाडी च्या माध्यमातून आपण सर्व क्षेत्रातील सर्व जाती-धर्मातील सर्वांच्या विकासाला हातभार लावूया आपलं एक मत वंचित बहुजन आघाडीला म्हणजेच आपलं मत या सर्व धर्म सर्व समभाव सर्वजन हिताय सर्वजन सुखाय बहुजन हिताय बहुजन सुखाय या विचाराला मग असं समजून आपण या वेळेस वंचित बहुजन आघाडीला मतदान करून प्रकाश आंबेडकरांना मुख्यमंत्री बनवण्याचं काम आपण करूया आणि सर्वागीण विकासाकडे धाव घेऊया.


Previous articleदेहूरोड मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कट आऊट ला लावलं शेन!चार तासात दोन आरोपींना केली अटक
Next articleबँक’ व्यवहाराशी निगडीत आजपासुन’हे’ 7 नियम बदलणार, दैनंदिन जीवनावर होणार परिणाम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eleven + 19 =