Home ठाणे काश्मिरी पंडितांना न्याय महाराष्ट्रानं दिला

काश्मिरी पंडितांना न्याय महाराष्ट्रानं दिला

0

ठाणे,दि.19 मार्च 2022 (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):–भारत देशात महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, ज्या राज्याने काश्मिरी पंडितांच्या मुलांना शिक्षणात आरक्षण दिले आहे. आणि हे आरक्षण दिले आहे ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी. त्यांनी कायमच काश्मिरी पंडितांना न्याय मिळावा म्हणून प्रयत्नशील राहिले आहे.

त्यामुळे कुणीही उठावे आणि काश्मिरी पंडितांविषयी ज्ञान पाजळावे असे करु नका. भाजप गेल्या सात वर्षापासून सत्तेत आहे, केंद्र सरकारने काश्मिरी पंडितांसाठी काय केले असा सवालही शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केला. त्यामुळे सिनेमा बघून कुणी पेटून उठा म्हणून आवाहन करत असेल तर ते चुकीचे आहे असेही मत अरविंद सावंत यांनी मांडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

two + three =