Home ताज्या बातम्या आरपीआयचे धर्मपाल तंतरपाळे निवडून येणार असल्याची चर्चा मतदानाआधीच रंगात

आरपीआयचे धर्मपाल तंतरपाळे निवडून येणार असल्याची चर्चा मतदानाआधीच रंगात

0
Oplus_16908288

किवळे,दि.१३ जानेवारी २०२६(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर संबंधित प्रभागात राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत. भारतीय जनता पार्टीच्या तीन उमेदवारांविरोधात जनतेत तीव्र नाराजी असल्याचे चित्र स्पष्ट झाले असून, भाजपकडून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) ला एक जागा दिल्यामुळे संपूर्ण प्रभागातून आरपीआयचे उमेदवार धर्मपाल तंतरपाळे हे निवडून येणार असल्याची चर्चा मतदानापूर्वीच जोर धरू लागली आहे.

धर्मपाल तंतरपाळे हे गेल्या अनेक वर्षांपासून फुले–शाहू–आंबेडकर विचार मंचाच्या माध्यमातून सामाजिक, धार्मिक आणि वैचारिक चळवळीत सक्रिय आहेत. समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी त्यांनी सातत्याने काम केले असून, धार्मिक चळवळीबरोबरच सामाजिक प्रश्नांवर ठाम भूमिका घेत रस्त्यावर उतरून आंदोलनं केली आहेत. त्यामुळे त्यांना केवळ राजकीय उमेदवार नव्हे, तर चळवळीतून घडलेला नेता म्हणून ओळखले जाते.
विशेष म्हणजे यंदाच्या निवडणुकीत मोठा जनाधार असणारे पत्रकार विकास कडलक तसेच रावेतमधील दीपक जाधव यांनी स्वतः निवडणूक न लढवता, वैचारिक भूमिका घेत धर्मपाल तंतरपाळे यांना निवडून आणण्यासाठी सक्रिय पाठिंबा दिला आहे. रिपब्लिकन पक्षाचे नेते दिलीप कडलक, त्यांचे पदाधिकारी आणि विविध समाजघटकांनी एकत्र येत धर्मपाल तंतरपाळे यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.
नगरसेवक पदावर नसतानाही धर्मपाल तंतरपाळे यांनी देहूरोड येथील उड्डाणपुलासाठी आंदोलन करून तो मार्गी लावला, तसेच मुंबई–पुणे महामार्गालगत शिंदे पेट्रोल पंपाजवळील उड्डाणपूल सत्ताधारी पक्षांकडून करून घेण्यासाठी तीव्र आंदोलन केले होते. सर्वसामान्यांचे अडलेले रस्ते मोकळे करण्यासाठी त्यांनी कोणताही राजकीय स्वार्थ न ठेवता काम केले, अशी भावना नागरिकांत आहे.
यंदाच्या निवडणुकीत अनुसूचित जातीतील ‘अ’ गटातून सक्षम उमेदवार नसल्याने, सर्व समाजघटकांनी एकमुखाने धर्मपाल तंतरपाळे यांनाच निवडून देण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, माजी नगरसेवक बाळासाहेब नामदेव ओव्हाळ यांच्याविरोधातही प्रभागात तीव्र नाराजी आहे. नगरसेवक असताना अपेक्षित विकासकामे न करणे, नागरिकांशी जनसंपर्क न ठेवणे आणि कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून त्यांच्या विरोधात प्रचार सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत जनतेने त्यांना घरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
एकूणच, भाजपातील अंतर्गत नाराजी, आरपीआयला मिळालेली संधी आणि धर्मपाल तंतरपाळे यांचे सामाजिक काम यामुळे या प्रभागात राजकीय उलथापालथ निश्चित असल्याचे संकेत मिळत आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

19 − ten =

error: Content is protected !!
Exit mobile version