पिंपरी,दि.१० जानेवारी २०२६(प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी):-प्रभाग क्रमांक २१ मधील वाढती लोकसंख्या, सामाजिक तणाव, कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने निर्माण होणाऱ्या संभाव्य अडचणी लक्षात घेता प्रभाग क्रमांक २१ ‘संवेदनशील’ घोषित करण्यात यावा, अशी ठोस मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधित पोलीस प्रशासनाकडे लेखी निवेदन सादर करण्यात आले असून, आगामी निवडणूक कालावधीत कोणतीही अनुचित घटना घडू नये, सामाजिक शांतता अबाधित राहावी आणि लोकशाही प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी ही मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात प्रभागातील वाढती लोकसंख्या, विविध सामाजिक घटकांची संख्या, पूर्वी घडलेल्या तणावपूर्ण घटनांचा संदर्भ तसेच अफवा व गैरसमज पसरवण्याचे प्रकार याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे.
➡️ “वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही,” असा विश्वास निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आला आहे.
या मागणीमुळे प्रशासनाकडून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त, सतर्कता आणि प्रतिबंधात्मक कारवाई होण्याची शक्यता असून, नागरिकांनीही याकडे सकारात्मक पाऊल म्हणून पाहिले आहे.
प्रजेचा विकास न्यूज नागरिकांच्या सुरक्षेसाठी उचलल्या जाणाऱ्या प्रत्येक जबाबदार मागणीच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.



