Home ताज्या बातम्या निवडणुकीच्या तोंडावर ‘भुरट्या भावी नगरसेवकां’चा सुळसुळाट!

निवडणुकीच्या तोंडावर ‘भुरट्या भावी नगरसेवकां’चा सुळसुळाट!

0

ना राजकारणाचं ज्ञान, ना प्रभागातील समस्यांची जाण, ना सामाजिक भान!

पिंपरी,दि. १२ जुन २०२५ (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी): – नक्की निवडणूक होईल की नाही होईल का अजून पुढे ढकलले जाईल अशा संभ्रम अवस्थेत असताना सुद्धा पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीचे पडघम जसजसे वाजू लागले आहेत तसतसे शहराच्या गल्लीबोळातून नवनवीन ‘भावी नगरसेवकां’ची पैदास होऊ लागली आहे. ज्याच्याकडे राजकारणाचं ज्ञान नाही मात्र बापजाद्याचा अमाप पैसा किंवा राजकीय वारसा आहे त्यांनाही नगरसेवक पदाची स्वप्ने पडू लागली आहेत.
२०२२ ला होणाऱ्या निवडणुका कोरोना मध्ये पुढे ढकलल्या गेल्या मात्र त्यापुढे इतक्या ढकलल्या गेल्या कि कोर्टाला निवडणूक घेण्याच्या आदेश काढावे लागले. मात्र नुकत्याच प्रभाग रचनाच्या आदेश आल्यानंतर अनेक इच्छुकांनी पुन्हा एकदा कंबर कसली काहींनी कार्यक्रम घेत, मी कार्यक्रम घेत आहे. माझी प्रसिद्धी होत आहे आता मी भावी नगरसेवक मला नगरसेवक करा. तर काहींनी महानगरपालिका प्रशासन व खासदार आमदार लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून होणारे काम हे कामे मीच केली आता मला नगरसेवक करा. तर काही नागरिकांच्या तक्रारीवर होणाऱ्या विकास कामांमध्ये अनेक भावी नगरसेवकांनी हजेरी लावली. फोटो काढले आणि ते कामे मीच करत आहे, असे वरचढ देखील चालू केले,तर काही भावी नगरसेवकांना सामाजिक धार्मिक राजकीय कशाशी जाण नसल्याने चार दोन फुकटे लुटारु कार्यकर्ते सोबत घेऊन, आता मी भावी नगरसेवक आहे,आता मी नगरसेवक होणारच असे स्वप्न देखील पडू लागले आहेत. मात्र जनता अशा सर्व भावी नगरसेवकांना त्यांची जागा दाखवील, भावी नगरसेवकांची जी अवस्था आहे ती यंदाच्या निवडणूक लांबीमुळे माजी नगरसेवकांमध्ये दिसत आहे. माजी नगरसेवकांनी केलेली विकास कामे बिल्डर धारजींनीने झाकून टाकली आहे. तर काही माजी नगरसेवकांनी स्वतःचा स्वार्थ लादत स्वतःचा खिसा कसा भरेल याकडे लक्ष दिले, जनता गेली उडत मी पुन्हा होणार नगरसेवक अशी भावना माजी आणि भावी नगरसेवकांमध्ये दिसत आहे.नागरीकांच्या समस्या पैक्षा कार्यक्रम आणि खोट्या प्रसिद्धि वर जास्त भर देताना आजी माजी भावी दिसत आहेत.

शहरातील कोणत्याही प्रभागात गेलात तर त्या प्रभागातील चौकाचौकात, गल्लीबोळात अशा भुरट्या भावी नगरसेवकांचे फ्लेक्स जागोजागी झळकताना दिसतात. प्रभागातीलच पाच – दहा बेरोजगार तरुण गोळा करून त्यांना सकाळचा चहा मिसळ आणि रात्रीची दारू पाजली की कट्टर समर्थक, निष्ठावंत कार्यकर्ते लगेच मागे मागे फिरायला मिळतात. मग या भावींना आपण नगरसेवक असल्याचा फिल देखील त्यांना यायला सुरवात होते.

विशेष म्हणजे हे सर्व भावी नगरसेवक ज्याप्रकारे पावसाळा आल्यावर लपलेली बेडकं बाहेर पडतात तशी फक्त निवडणूक जवळ आली की निवडणुकीपुरतीच बाहेर पडतात. दरम्यानच्या साडेचार वर्षांच्या कालावधीत हे कुठेच दिसत नाहीत. आणि प्रभागातील एकाही प्रश्नावर हे आवाज उठवत नाहीत. की साधं प्रशासनाला एक निवेदनही देत नाहीत. याचं मुख्य कारण म्हणजे यांना प्रभागातील समस्याच माहीत नसतात. आणि माहीत असल्या तरी बघू निवडणूक आल्यावर या वृत्तीमुळे गप्प राहतात.

अनेकदा प्रभागातील मतदारांनाही हा कोण नवीन उगवला? असा प्रश्न पडण्याइतपत हा भावी नगरसेवक नवीन असतो. पण निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी फाफट कार्यक्रम घेऊन आपण किती कार्यक्षम आहोत हा दाखविण्याचा हास्यास्पद खटाटोप हे करीत असतात. त्यातच कोणी अनुभवी नागरिकाने मार्गदर्शन केले तरी त्यांचा सल्ला फाट्यावर मारत आपण किती अतिशहाणे आहोत हे दाखवून द्यायचे. याचा शेवट हा आपल्याच हाताने आपल्याच पायावर धोंडा मारून घेण्यासारखे आहे हे मात्र त्यांच्या ध्यानातही येत नाही.

अशा संधीसाधु आणि भुरट्या भावी नगरसेवकांना मतदारांनी त्यांची जागा दाखविणे गरजेचे आहे. भावी असो की विद्यमान नगरसेवक ‘पाच वर्षात तुम्ही प्रभागासाठी काय केलं? हा जाब सामान्य मतदारांनी विचारला पाहिजे. पैसा आणि दारू, मटणाला न भुलता तळमळीने काम करणाऱ्या गरीब कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहून त्याला काम करण्याची संधी दिली पाहिजे. तर आणि तरच प्रभागातील सच्चा आणि खऱ्या कार्यकर्त्याला न्याय मिळेल आणि अशा भुरट्या भावी नगरसेवकांच्या उत्पत्तीला आळा बसेल.
गंमतीशीर बाब म्हणजे काही विद्यमान नगरसेवक ही भावी नगरसेवकांन प्रमाणेच आहेत.साडेचार वर्षात प्रभागात फिरले नाहीत.तर काहीनी साडेचार वर्ष सेटलमेंट सारख्या प्रकरणात घालवली तर काहीनां अजुन पालिका प्रशासनही समजत नाही.वार्डा प्रभागासाठी काम करायच सोडुन मौजमजे साठी लग्नसंभारभात नाव पुकारण्याइतपत त्यांनी मजल मारली त्यामुळे यंदा अशा आजी माजी भावी नगरसेवकांना मतदार राजाने दणका द्यायलाच हवा.आणि कामकरणारे समाजसेवक प्रभागाचा अभ्यास करुन समस्या पालिका प्रशासनामार्फत सोडवणारे नगरसेवक निवडुन दिले पाहिजे,तुम्हि ठरवा आता नक्की करायच काय ? अशा भुरट्यांना जागा दाखवा नाहीतर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही तर ञास दायक ठरेल.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

2 + one =

error: Content is protected !!
Exit mobile version